अनंत करमुसे मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या मारहाण प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
अनंत करमुसे प्रकरणात राज्य सरकारच्या तपास यंत्रणांना पुढील तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच याचा अहवाल तीन महिन्यात सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. जितेंद्र आव्हाड यांचे सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी अनंत करमुसे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी घेऊन जात मारहाण केल्याचा आरोप आहे.
या मारहाण प्रकरणी दिलेल्या निकालात आज सुप्रीम कोर्टाने जितेंद्र आव्हाड यांना फटकारलं आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आजच्या निकालात या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची मागणी मान्य केली आहे.तसेच तिन महिन्यात तपास संपवावा आणि चार्जशीट दाखल करावी असे निर्देष सुप्रीम कोर्टाने दिल्याचे करमुसे यांनी सांगितले. करमुसे हे एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
हेही वाचा - जाणून घ्या काॅन्ट्रा फंडातल्या गुंतवणुकीबाबत
प्रकरण काय आहे?
अनंत करमुसे यांनी 5 एप्रिल 2020 मध्ये जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर आव्हाड यांच्या सुरक्षारक्षकासह काही कार्यकर्त्यांनी करमुसे यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेत मारहाण केल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी अनंत करमुसे यांचे अपहरण करत मारहाण केल्या प्रकरणी आव्हाडांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.