

Maharashtra
esakal
मुंबई: पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटी यंदाही सज्ज झाली आहे. राज्यभरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांना सुखकर प्रवासासाठी पाच हजार ५०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे. कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना बस उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.