
Nanded News- महाराष्ट्रामध्ये किंवा देशांमध्ये अनेक लोक आहेत. मात्र एकाच उद्योग समूहाला सगळे प्रकल्प जर जात असतील तर निश्चितच लोकांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. एकाच उद्योग समूहाला एवढे प्रकल्प कसे काय दिले जातात, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला. ते नांदेड य़ेथे बोलत होते.
अशोक चव्हाण म्हणाले की, देशात अनेक उद्योग समूह आहेत. मात्र सगळे प्रकल्प एकाच समूहाला दिले जातात. लोकांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. त्यामुळे इतर जे चांगले डेव्हलपर आहेत, त्यांचाही सरकारने विचार करावा, असं मला वाटतं अशी प्रतिक्रिया अशोकराव चव्हाण यांनी दिली.
धारावी पुनर्विकासाचा महाप्रकल्प अदानींना दिल्याचा महाराष्ट्र सरकारचा जीआर जारी झाला. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान शिंदे गटाच्या आमदारांनी भाजपसोबत जाताना आम्ही अजित पवार यांना कंटाळून जात आहोत, असे सांगितले होते. आता तर त्याच अजित पवारांना पूर्वी जे खातं होत तेच देण्यात आले आहे. त्यामुळे आता त्या आमदारांना विचारायला हवं, असंही चव्हाण म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.