Bhagat Singh Koshayari: राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सध्या भलतेच चर्चेत आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी केलेली वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करुन अनेकांची नाराजी ओढावून घेतली आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेली आक्षेपार्ह वक्तव्य हे कोश्यारी यांना चांगलेच भोवले आहे.
विरोधी पक्षानं कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली आहे, राज्यपाल हे एका राज्याचे प्रतिनिधित्व करतात. ते भुषवत असलेले पद हे राजकीय नसून संविधानिक आहे. मात्र त्या पदाची प्रतिष्ठा न ठेवता त्याला डाग कसा लागेल याचा विचार बऱ्याचदा कोश्यारी यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी देखील मुंबईतील एका कार्यक्रमामध्ये त्यांनी मुंबईच्या प्रगती सर्वाधिक वाटा हा गुजराती उद्योगपतींचा आहे. असे म्हटले होते. त्यामुळे कोश्यारी यांच्याप्रती नाराजी वाढीस लागली होती.
आतापर्यत कोश्यारी यांच्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेनेचे संजय राऊत, अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली. काही दिवसांपासून राज्यपाल यांच्या वक्तव्यामुळे त्यांना तातडीनं महाराष्ट्रातून पदमुक्त करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता स्वत राज्यपाल यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. त्यांनी आपल्याला आता आपल्या राज्यात परत जाण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोश्यारी यांच्यावर नेटकऱ्यांनी तोफ डागली आहे.
कोश्यारी यांची प्रतिक्रिया व्हायरल होताच त्यांच्यावर पुन्हा टीका होऊ लागली आहे. अनेकांनी यावेळी सुचक वक्तव्यंही केली आहेत. जसं की, राज्यपाल यांना जायला सांगितले की त्यांना खरचं जायची इच्छा आहे. त्यांना केंद्रातून आदेश आला की काय अशा प्रकारच्या प्रतिक्रियांनी आता नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.