मोठी बातमी! उजनी धरणावरील ९९ टक्के योजना बंद पडणार; सोलापूरसह पुणे, नगर, धाराशिवची चिंता वाढणार

उजनी सध्या मायनस ४४ टक्क्यांवर आहे. सोलापूर शहरासाठी १० मेपासून उजनीतून भीमा नदीद्वारे पाणी सोडले जाणार आहे. त्यावेळी पाच ते साडेपाच टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे.
Water Shortage
Water ShortageSakal

सोलापूर : सोलापूरसह नगर, पुणे, धाराशिव या शहरांसाठी वरदायिनी असलेले उजनी धरणातील पाणीसाठा सध्या मायनस ४४ टक्क्यांवर आहे. सोलापूर शहरासाठी आता १० मेपासून उजनीतून भीमा नदीद्वारे पाणी सोडले जाणार आहे. त्यावेळी साधारणत: पाच ते साडेपाच टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. हे आवर्तन सोडल्यावर धरण उणे ५५ टक्के होईल. त्यावेळी धरणावरील ४१ पाणीपुरवठा योजनांपैकी ९९ टक्के योजना बंद पडणार आहेत.

गतवर्षी सोलापूर जिल्ह्यासह धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने उजनी केवळ ६६ टक्क्यांपर्यंतच भरले होते. मागील सहा महिन्यांत धरण रिकामे झाले आहे. सध्या जिल्हाभर दुष्काळाची दाहकता वाढत असून उन्हाची तीव्रता देखील वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सव्वाशेहून अधिक टॅंकर सुरू झाले आहत. त्यातच धरणावर अवलंबून श्री सिद्धटेक देवस्थान ट्रस्ट सिद्धटेक, कर्जत, धनस्मृती टेक्स्टाईल प्रा.लि. झरे, नेचर डिलाईट प्रा.लि. कळस, भैरवनाथ शुगर प्रा.लि. आलेगाव, शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान, वनगळी, रे नगर फेडरेशन कुंभारी, हरनेश्वर ॲग्रो लि. कळस (ता. इंदापूर), बारामती ॲग्रो लि. पिंपळी, अंबालिका शुगर वर्क्स प्रा.लि. अंबालिका नगर, कर्जत, भैरवनाथ शुगर वर्क्स, विहाळ युनिट-दोन, श्री मकाई साखर कारखाना, भिलारवाडी, युटोपीयन शुगर लि. यांचाही पाणीपुरवठा उजनीची पातळी खालावल्याने बंद पडला असून काहींचा पाणीपुरवठा लवकरच बंद पडेल, अशी सद्य:स्थिती आहे.

धरणावरील महत्त्वपूर्ण योजनांची स्थिती

  • पाणीपुरवठा योजना बंद पडणारी पाण्याची टक्केवारी

  • सोलापूर महापालिका उणे ५५.८८ टक्के

  • करमाळा नगरपालिका उणे ४३.५९ टक्के

  • बार्शी-कुर्डुवाडी नगरपालिका उणे ५५.८८ टक्के

  • इंदापूर नगरपालिका उणे ५५.६० टक्के

  • बारामती नगरपालिका उणे ५५.६० टक्के

  • धाराशिव नगरपालिका उणे ६१.७४ टक्के

  • कर्जत पाणीपुरवठा योजना उणे ४३.५९ टक्के

  • टेंभुर्णी नळ पाणीपुरवठा योजना उणे ५५.८८ टक्के

  • जामखेड नगरपालिका उणे ५५ टक्के

  • एनटीपीसी उणे ५५ टक्के

  • एमआयडीसी, बारामती उणे ३४.३० टक्के

गावांच्या ‘या’ योजनाही बंदच्या मार्गावर

जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना देखील उजनीवरून आहेत. आता धरणाने तळ गाठल्याने अनेक गावांच्या योजना बंद पडल्या आहेत. दरम्यान, त्या पाणीपुरवठा योजनांमध्ये व्होळे व २७ गावे (उणे ५५.८८ टक्के), कव्हे व १० गावे (उणे ५५.८८ टक्के), जेऊर व २९ गावे (उणे ३९.०६ टक्के), राशीन (उणे ४३.५९ टक्के), अखोणी व २२ गावे (उणे ३४.३० टक्के), जिंती (उणे ४३.५९ टक्के), केत्तूर नं.२ (उणे ४३.५९ टक्के), सावडी कोर्टी व भिगवण (उणे ४३.५९ टक्के), शिरसोडी व २ गावे, गागरगाव, देऊळगाव राजे या योजना देखील मायनस ३५ टक्क्याला बंद पडतात. याशिवाय देवळालीचा पाणीपुरवठा उजनी धरण उणे ५५.८८ टक्के झाल्यावर बंद पडते तर नीरा नरसिंहपूर व पिंपळखुटे, कुर्डू गाव, अंबड (ता. माढा) या पाणीपुरवठा योजना देखील आता बंद पडल्याची स्थिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com