Monsoon Session : अबू आझमी अन् भाजपा आमदारांत जुंपली; वादानंतरचं ट्वीट चर्चेत

BJP MLA atul bhatkhalkar tweet after literal argument with MLA abu azmi Monsoon assembly session 2023 rak94
BJP MLA atul bhatkhalkar tweet after literal argument with MLA abu azmi Monsoon assembly session 2023 rak94esakal

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्या वक्तव्यावरू सत्त काहीना काही वाद होताना पाहायला मिळत आहेत. मागील आठवड्यात वंदे मातरम बद्दलच्या त्यांच्या वक्तव्यावरुन सभागृहात मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर आता जम्मू आणि कश्मिर येथील हिंदूंबद्दल केलेल्या त्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद सरु होण्याची शक्यता आहे.

समाजवादी पक्षाते आमदार आझमी यांनी काश्मिर आणि काश्मिरी पंडितांबद्दल केलेल्या वक्तव्यचावरून भाजपचे आमदार अतुल भातकळकर चांगलेच भडकल्याचे दिसून आले. अबू आझमी यांनी सभागृहात बोलताना काश्मिरमध्ये फक्त ८९ पंडितांची हत्या झाल्याचं विधान केलं. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर आणि आझमी यांच्यात वाद पेटला.

BJP MLA atul bhatkhalkar tweet after literal argument with MLA abu azmi Monsoon assembly session 2023 rak94
Weather Update: कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आज मुसळधार, वाचा हवामान विभागाचा अंदाज

भाजप आमदार अतुळ भातकळकर यांनी सभाग्रहातील या वादाचा व्हिडीओ ट्वीटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओ पोस्टमध्ये त्यांनी दिलेलं कॅप्शन सध्या चर्चेत आहे. "मावा आघाडीचे (महाविकास आघाडीचे) सरकार असताना अबू आझमी सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर बसला होता. पण बहुधा सरकार बदलले आहे, याचा त्याला विसर पडला असावा. कश्मीरमध्ये फक्त ८९ पंडीतांची हत्या झाली असे निलाजरे विधान केल्यानंतर सभागृहात त्याला जाम हाणला..."

BJP MLA atul bhatkhalkar tweet after literal argument with MLA abu azmi Monsoon assembly session 2023 rak94
Rohit Sharma WI vs IND : मी कधीही विचार केला नव्हता... रोहितनं सांगितलं बॅटिंग ऑर्डर बदलण्याचे कारण

भातखळकर काय म्हणाले?

"अबू आझमी बोलले की फक्त ८९ हिंदू पंडितांची हत्या झाली. एक व्यक्ती जरी केली तर ती तेवढीच महत्वाची असते. त्यांचे उद्गार काढून टाका. फक्त ८९ म्हणजे काय? अध्यक्षांच्या माध्यमातून मी त्यांना (अबू आझमी) विचारतोय, या सदनात भाषण करण्यापूर्वी वंदे मातरम म्हणणार की नाही? हे आधी सांगा आणि मगच बोला! आरएसएसचा उल्लेख का करता इकडे? या देशात राहायचं असेल तर वंदे मातरम म्हणावंच लागेल."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com