Devendra Fadnavis : आम्हांला अजून 'त्या' मतदारसंघांपर्यंत पोहोचायचं आहे; फडणवीसांच्या विधानाने खळबळ

Devendra Fadnavis
Devendra Fadnavisesakal

मुंबईः राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे राज्यातील सर्वात मोठे नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलं आहे. त्यांच्या विधानाने राजकीय क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आमच्याकडे अनेक लोक आले पण आम्हांला अजूनही त्या अनेक मतदारसंघांपर्यंत पोहोचायचं आहे, असं सूचक विधान फडणवीसांनी केलं आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशासंबंधीच्या चर्चा रंगल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्विटमुळे खळबळ उडालेली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलंय.

Devendra Fadnavis
सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत CM शिंदे ११ व्या स्थानावर; मग पहिलं कोण?

एका मुलाखतीमध्ये बोलतांना फडणवीस म्हणाले की, आमच्या आत्मविश्वासामुळे अनेकजण आमच्या संपर्कात असतात. अनेक नेते आमदार संपर्कात असतात. मागच्या पाच वर्षांमध्ये अनेकजण आमच्या संपर्कात आले. संपर्काच्या नात्यातून निवडणुकीमध्ये परिवर्तन घडतं.

ते पुढे म्हणाले की, अजूनही अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. पक्षाची गरज कधीच संपत नसते. राज्यात असे अनेक मतदारसंघ आहेत जिथे आम्ही अद्याप पोहोचलेलो नाही. तिथे पोहोचायला मिळालं तर चांगलंच आहे, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, अजित पवार यांच्याविषयीच्या चर्चांनी राज्यात चर्चा रंगल्या आहेत. २०१९मध्ये राज्याने पहाटेचा शपथविधी बघितला होता. त्यानंतर अजित पवार सहकाऱ्यांसह पुन्हा राष्ट्रवादीशी एकरुप झाले तर पण त्यावर त्यांनी कधीच स्पष्टपणाने भाष्य केलेलं नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com