

मुंबईः राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिकनगरींच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकार संबंधित प्राधिकरणाच्या सदस्यांना देण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या तरतुदीस मान्यता देऊन ‘महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम- १९६५’ मध्ये सुधारणा करण्यात येईल. याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करण्यास तसेच त्यासाठीचा अध्यादेश काढण्यास आज (मंगळवारी) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.