

परभणी : राज्यात घडणाऱ्या विविध घटनांतून दिवसेंदिवस क्रौर्य वाढत चालले आहे. कायद्याचा धाक राहिलेला नाही. लोक बेधडकपणे गुन्हे करत आहेत. हे धैर्य येते कुठून? गुन्हेगारी मानसिकतेला आळा घालण्यासाठी समाजाने एकजूट होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी रविवारी व्यक्त केले.