मुंबई - ‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडेच मतचोरीचे कंत्राट आहे. काँग्रेसवालेच मतचोरी करत असून खरे मतचोर तेच असल्याचे सिद्ध झाले आहे. आता राहुल यांनी यावर उत्तर दिले पाहिजे,’ असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला..काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुतण्याचे मतदान तीन ठिकाणी असल्याची बाब समोर आली आहे. यावरून भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आणि आमदार अतुल भोसले यांनी ही बाब समोर आणली..इंद्रजित यांचे कराड, मलकापूर आणि पाटण या तीन ठिकाणी मतदान असल्याची बाब समोर आली आहे. याबाबत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, ‘चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक असतात असे म्हणतात. चोरी करायची आणि चोरी झाल्याचा कांगावाही करायचा ही चोरांची रीत असते. राहुल गांधींची मतचोरी मोहीम हा त्यातीलच एक प्रकार आहे.’.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.