
पंढरपूर : महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी आणि सर्वांना सन्मार्गाने चालण्याची पांडुरंगाने सुबुद्धी द्यावी, असे साकडे विठुरायाला घातल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले. फडणवीस यांनी आज पहाटे अडीच वाजता विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी त्यांनी विठुरायाला साकडे घातले.