मुलांच्या आठवणीत CM एकनाथ शिंदे भावूक

शहीद झालो तरी चालेल पण माघार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला इशारा
Eknath Shinde
Eknath Shinde esakal

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे-भाजपा सरकारने पहिली लढाई जिंकल्यानंतर आता विश्वासदर्शक ठरावही जिंकला. यानंतर भाषणादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुलांच्या आठवणीत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

माझा श्रीकांत डॉक्टर झाला. पण मी त्याला वेळ देऊ शकलो नाही. मी लेट यायचो आणि तो आधी निघून जायचा. मी संघटनेला वेळ दिला. शिवसेना हेच माझं कुटूंब मानलं. माझ्या आयुष्यात वाईट प्रसंग आला. माझी मुलं माझ्यासमोर डोळ्यासमोर गेली. तेव्हा मला दिघेंनी आधार दिला. असे सांगत एकनाथ शिंदे भावूक झाले. त्यांना यावेळी अश्रू अनावर झाले.

बंड का केलं?

बंड का केलं? याच कारण शोधण गरजेच होत. विधान परिषद निवडणुकीत मिळालेल्या वागणुकीमुळे अस्वस्थ होतो. माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. असे आरोप शिंदे यांनी यावेळी केले.

एका बाजूला सत्ता, सरकारी यंत्रणा होती. तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा सामान्य सैनिक होता. माझ्यासोबत आलेल्यांपैकी एकाही आमदाराने विचारलं नाही की किती दिवस लागतील. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, असेही त्यांनी म्हटले. आम्ही स्वार्थासाठी नव्हे विचारांसाठी एकत्र आलो आहोत, असेही त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे मुलांच्या आठवणीत भावूक

माझा श्रीकांत डॉक्टर झाला. पण मी त्याला वेळ देऊ शकलो नाही. मी लेट यायचो आणि तो आधी निघून जायचा. मी संघटनेला वेळ दिला. शिवसेना हेच माझं कुटूंब मानलं. माझ्या आयुष्यात वाईट प्रसंग आला. माझी मुलं माझ्यासमोर डोळ्यासमोर गेली. तेव्हा मला दिघेंनी आधार दिला. असे सांगत एकनाथ शिंदे भावूक झाले. त्यांना यावेळी अश्रू अनावर झाले.

माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं. कशासाठी जगायचं. कुणासाठी जगायचं. असा प्रश्न उपस्थित झाला होता. माझ्या कुटूंबाला आवश्यकता होती. दिघे साहेब पाच सहा वेळा माझ्या घरी आले. मी संघटनेला न्याय देऊ शकत नाही असं सांगितल. त्यावेळी दिघे साहेब म्हणाले, तुला दुसऱ्यांच्या डोळ्याचे अश्रु पुसावेच लागतील. मी दिघे साहेबांना देव मानतो.

अशा संघर्षमय आठवणींना उजाळा देताना मुख्यमंत्री भावूक झाले.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

शिवसेना भाजप युतींच सरकार स्थापन झाल. गेले पंधरा दिवस, शिवसेनेचे चाळीच आमदार आणि अपक्ष दहा असे पन्नास आमदार माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासोबत राहिले. त्याचे मी धन्यवाद देतो. मला विश्वास बसत नाही मी सभागृहात मुख्यमंत्री म्हणून बोलतोय.

आपण पाहिलं तर विरोधी पक्षातून सत्तेकडे जायची वाटचाल असते. मात्र, आज आपण ऐतिहासिक घटना पाहतोय. मला फडणवीस म्हणाले फक्त देश नाही तर ३३ देशांनी या घटनेची नोंद घेतली आहे. सत्तेतून मी नगरविकास मंत्री होतो. अनेक मंत्री सरकार, सरकार मध्ये बसलेली मोठी माणसं एकिकडे आणि दुसरी बाळासाहेबांचे शिवसैनिक.

मला अभिमान आहे आमच्या पन्नास लोकांचा आम्ही मिशन सुरू केल तेव्हा कुठे निघालो आहे. किती दिवस लागतील. कुणीही विचारलं नाही. मी मतदानादिवशी डिस्टर्ब होतो. मतदानादिवशी मला नीट वागणुक मिळाली नाही. असा आरोप करत मला जी वागणुक देण्यात आली ती सर्वांनी पाहिली आहे.

अन्ययाविरुद्ध बंड पुकारायचे ही बाळासाहेबांची शिकवण आहे. माझे कसे खच्चीकरण करण्यात आल हे सुनिल प्रभुंना माहिती आहे. त्यावेळी मी ठरवलं लढून शहीद झालो तरी चालेल मात्र मागे हटणार नाही.

मी आमदारांना सांगितलं होत काळजी करु नका मी तुमचं भवितव्य सुरक्षित करेन. आणि जगाचा निरोप घेईन. एकिकडे काढून टाकायचे. माझ्या घरावर दगड मारण्याचे आदेश द्यायचे. मात्र, एकनाथ शिंदेंच्या घरावर दगड मारण्यास कुणाच्यात धमक नाही. आव्हाडांना माहिती आहे माझ्या मागे किती लोक आहेत. ती डसून टाकतील. असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

वयाच्या सतराव्या वर्षी बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावीत

मी जीवाचं रान केलंय. रक्ताच पाणी केलयं. मी वयाच्या सतराव्या वर्षी बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावीत झालो. आणि शिवसैनिक झालो. मी वयाच्या आठराव्या वर्षी शाखाप्रमुख झालो. मी साहेबांना सांगितलं सिनिअर लोकांना पद द्या. ते त्यांनी मला एक शिवी घातली. आणि शाखाप्रमुख बनवलं.

मी नंतर नगरसेवक झालो. मात्र, त्याच्या आधी होऊ शकलो असतो. युतीच्या माणसाला तिकीट द्यायाचं ठरलं. तेव्हा साहेब बोलले बघू युतीचं तुला तिकीट देतो. मी म्हटलं जाऊ द्या साहेब, आपण हे पुढच्यावर्षी बघू. मी त्यावेळी पदाची लालसा ठेवली नाही.

आता आमचा बाप काढला. रेडा म्हणाले, अनेक वाईट शब्द काढले. मी शांत असतो. पण अन्याय झाल्यावर मला शांत राहता येत नाही. माझं काम केसरकरांनी हलकं केलं. त्यांनी मी मीडियाला बोलवायला सांगितलं. बाप काढले. माझे वडील जिवंत आहेत.

माझी आई गेली. एकदा गाली गेल्यावर उद्धव साहेबांचा फोन आला. त्यावेळी उद्धव साहेबांना सांगितलं माझ्या बाळाला सांगितलं. माझ्या आईने मला खुप कष्टान वाढवलं आहे.

मी सोळा लेडीज बार तोडणार एकनाथ शिंदे

मी सोळा लेडीज बार तोडणार एकनाथ शिंदे आहे. माझ्यावर शंभर पेक्षा जास्त केस आहेत. मी बंद करुन टाकलं. कोर्टात माझ्यावर पीटीशन फाईल झालं. मुंबईत गँगवार सुरू होतं. मला संपवण्याचा त्यांचा प्लॅन होता. मी घाबरलो दिघे साहेबांनी शेट्टी लोकांनी बोलावलं. आणि एकनाथ काही झालं तर याद राख. कोणत्याही आंदोलनात मी मागे पाहिलं नाही. माझ्यासोबतच्या कार्यकर्त्यांनीही परिणामांचा विचार कधीच केला नाही.

बहुमताचा ठराव जिंकताच मुख्यमंत्री शिंदेंच्या दोन मोठ्या घोषणा

राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. तसेच, रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा शिवसेना-भाजप युती सरकारचा निर्धार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com