'निवडणुका कशा घ्यायच्या, हे आयोग ठरविणार की विरोधक'

'निवडणुका कशा घ्यायच्या, हे आयोग ठरविणार की विरोधक'

नाशिक - निवडणुका कशा घ्यायच्या, हा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. विधानसभा निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेनुसार घ्याव्यात, अन्यथा बहिष्कार टाकण्याच्या मागणीला काही अर्थ नाही. निवडणूक आयोग ते पाहून घेईल, अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ईव्हीएमवरील विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला.

प्रथमच नाशिकला आलेले महाजन पत्रकारांशी बोलत होते. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मतपत्रिकांनुसार निवडणुकांची मागणी करीत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महाजन यांनी, निवडणूक कशी घ्यावी, हे ठरविणारे ते कोण, असा प्रश्‍न उपस्थित केला. विधानसभेला विरोधकांच्या जेमतेम ५० जागा येतील, असा दावाही त्यांनी केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे केंद्रात मंत्री झाल्याने त्यांच्या जागेवर कोण?, यावर बोलताना महाजन यांनी पक्षातर्फे जो निर्णय घेतला जाईल, तो सर्वांना मान्य असेल, असे सांगितले. 

पुरोहितांमध्ये मध्यस्थी
त्र्यंबकेश्‍वरला स्थानिक पुरोहित व बाहेरून स्थायिक होत असलेले पुरोहित यांच्यात नारायण नागबलीच्या पूजाविधीवरून जो व्यावसायिक वाद उफाळून आला आहे, त्यात मध्यस्थी करीत हा वाद मिटविणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com