
नवी दिल्ली : डॉ. मनमोहनसिंग हे तीस वर्षांपूर्वी देशाचे अर्थमंत्री असताना एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) तुलनेत शिक्षण आणि आरोग्य यासारख्या सामाजिक बाबींवर जेवढा खर्च होत होता, तेवढाच मोदी सरकारच्या कार्यकाळातही होत असून त्यात वाढ झालेली नसल्याचा निष्कर्ष अर्थ मंत्रालयाची थिंक टॅंक संस्था असलेल्या ‘एनआयपीएफपी’च्या अहवालातून समोर आला आहे. मागील तीस वर्षांतील आर्थिक प्रगतीनंतरही मानवी विकासाच्या खर्चात वाढ झाली नसल्याचे या संस्थेने म्हटले आहे.