काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याने काँग्रेसमधलं अंतर्गत कलह आता एका महत्त्वाच्या वळणावर पोहोचला आहे. थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा हायकमांडकडे दिला आहे. या पत्रात त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर काही गंभीर आणि थेट आरोप केले आहेत.
या पत्रामध्ये बाळासाहेब थोरात यांनी पदवीधर निवडणुकीच्या वेळी सत्यजित तांबे यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल भाष्य केलं आहे. थोरात पत्रात म्हणतात की, आपण माफी मागायला तयार असताना प्रदेशाध्यक्ष दुसऱ्या उमेदवाराला घेऊन फिरत होते, असं सत्यजित तांबे म्हणाले होते. नाना पटोले यांनी हे प्रकरण मिटवण्याऐवजी ते वाढवले. जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. याबाबत पक्षाने एकदाही विचारणा केली नाही.
थोरात या पत्रात पुढे म्हणतात, "सुधीर तांबे, सत्यजित तांबे यांना त्यांची बाजू मांडू न देताच पक्षातून निलंबित करण्यात आलं. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आपल्याशी चर्चा केली नाही. शिवाय खालच्या स्तरावरची अनेक विधानं केली. नाना पटोलेंनी आमच्याविषयी इतका द्वेष असेल तर त्यांच्याबरोबर काम करणं अशक्य आहे."
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.