
मुंबई : शेतकऱ्यांचा अपमान करण्याची एकही संधी भाजपच्या नेतृत्वाखालील युती सरकार सोडत नाही. शेतकऱ्यांना भिकारी म्हटल्यानंतर आता कृषिमंत्र्यांनी कर्जमाफीचे काय करता? लग्न, साखरपुडे करता; शेतीत गुंतवता का, असा अजब प्रश्न विचारून पुन्हा शेतकऱ्यांचा अपमान केला आहे.