Lakhimpur kheri Violence : ...तर राज्यात जेलभरो आंदोलन करू, काँग्रेसचा इशारा

nana patole
nana patolenana patole

मुंबई : ''उत्तर प्रदेशातील लाखीमपूर खेरीमध्ये भाजपने हिंसाचार (lekhimpur kheri violence) केला आहे. त्याठिकाणी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (congress leader priyanka gandhi) शेतकऱ्यांचे सांत्वन करण्यासाठी गेल्या. मात्र, त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) रोखून धरलं आहे. उत्तर प्रदेशात काय तालिबानी सरकार आहे काय? प्रियांका गांधींनी सोडलं नाहीतर आम्ही महाराष्ट्रात जेलभरो आंदोलन करू'', अशा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (maharashtra congress president nana patole) यांनी दिला.

nana patole
'शेतकऱ्यांवर कारवाई करणं हे भाजपचं अधिकृत धोरण आहे का?'

भाजपचं सरकार शेतकरी विरोधी आहे. शेतकरीविरोधी व्यवस्थेचा आम्ही निषेध करत आहेत. उत्तर प्रदेशात झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेसकडून प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करत आहेत. मात्र, शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्यांविरोधात कारवाई झाली नाहीतर आम्ही महाराष्ट्र बंदची हाक देऊ. तसेच उत्तर प्रदेश आणि मोदींचं सरकार बरखास्त करण्याची मागणी करू, असेही पटोले म्हणाले.

शेतकरी भारताचा कणा आहे. त्यांची विटंबना करण्याचा अधिकार भाजपला दिला नाही. भाजपचं धोरण शेतकरीविरोधी आहे. राज्यात देखील वारंवार पूर, नैसर्गिक वादळं यामुळे शेतकरी संकटात आहे. पण, भाजप सरकार त्याचे राजकारण करून शेतकऱ्याला उद्ध्वस्त होताना बघत आहे. या सर्वांचा हिशोब घेण्याची वेळ आली आहे. भाजप हा खोटारडा पक्ष आहे. खोट बोलायचं पण रेटून बोलायचं आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करा, हे भाजपचं धोरण आहे, अशी टीका पटोले यांनी केली.

लाखीमपूर खेरीमध्ये नेमकं काय घडलं?

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे एका कार्यक्रमासाठी लखीमपूर खेरी येथे आले होते. त्यानंतर ते मिश्रा यांचे मूळ गाव भवानीपूर येथे जाणार होते. त्यांच्या कार्यक्रमाची माहिती मिळताच कृषी कायद्यांच्या विरुद्ध आंदोलन करणारे शेतकरी ते उतरणार असलेल्या हेलिपॅडपाशी सकाळी आठ वाजताच पोहोचले. त्यांनी हेलिपॅडवर ठिय्या दिला व त्याचा ताबा घेतला. त्यानंतर दुपारी पावणेतीन वाजता मोटारीने मिश्रा आणि मौर्य यांचा ताफा तिकोनिया चौकातून गेला, तेव्हा त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. हे पाहताच शेतकरी संतप्त झाले. त्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावली. या घटनेत चार शेतकरी मृत्युमुखी पडल्याचे सांगितले जाते. तर चार भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झालाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com