Congress Vs BJP : निवडणुुकीत‘मॅच फिक्सिंग’च झाले, काँग्रेसची भाजपवर टीका; राहुल गांधींच्या प्रश्‍नांना आयोगाने उत्तर देणे अपेक्षित

Maharashtra Election : काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर ‘मॅच फिक्सिंग’चा आरोप करत भाजपवर जोरदार टीका केली असून, राहुल गांधींच्या प्रश्नांना निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे, अशी मागणी केली आहे.
Congress Vs BJP
Congress Vs BJPSakal
Updated on

मुंबई : ‘महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत फसवणूक, हेराफेरी आणि जनादेशाचे उल्लंघन करून लोकशाहीचे वस्त्रहरण कसे केले, याची राहुल गांधी यांच्या लेखातून मांडणी केलेली आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरच संशय बळावला असल्याने या गंभीर प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने देऊन संभ्रम दूर करणे अपेक्षित होते, मात्र भाजपकडून त्याची उत्तरे दिली जात आहेत हे आणखी गंभीर असून निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’ झाले यावर शिक्कामोर्तब करणारे आहे,’’ अशा शब्दात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com