

मुंबई : चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नियोजित भाषण करू देण्यात आले नव्हते. शिंदे यांनी चैत्यभूमीवरच संताप व्यक्त केल्याचे समजते. ‘कळू देत लोकांना, कोण खच्चीकरण करतंय ते’ या शब्दांत त्यांनी संताप व्यक्त करत नाराजी उघड केली.