Devendra Fadnavis : दंगली होतील असं 'त्यांचं' वक्तव्य; फडणवीसांनी घेतला राष्ट्रवादीच्या नेत्याचा समाचार

devendra fadnavis
devendra fadnavis Sakal

मुंबईः महाराष्ट्रात दंगली होतील, असं वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. हा समाजाचा आणि रामभक्ताचा अपमान असल्याचंही फडणवीस म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक विधान केलं होतं. ते म्हणाले होते की, दंगली घडवण्यासाठीच राम नवमी आणि हनुमान जयंती साजरी केली जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बोलतांना त्यांनी औरंगाबाद येथील दंगलीचा हवाला दिला होता.

हेही वाचाः संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्याला उत्तर देतांना आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांचं हे विधान आक्षेपार्ह आहे. लोकांमध्ये रामाविषयी आणि हनुमानाविषयी श्रद्धा आहे. दंगलीकरीता रामनवमी किंवा हनुमान जयंती साजरी केली जाते, असं म्हणणं म्हणजे भक्तांचा अपमान आहे.

ते पुढे म्हणाले की, नेत्यांनी महाराष्ट्रात दंगली होतील असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. अशा प्रकरणात काळजीपूर्वक बोललं आणि वागलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलंय.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी औरंगाबाद येथे उसळलेल्या दंगलीचा हवाला देत हनुमान जयंती आणि राम नवमी साजरी करण्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com