

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपल्या 'पीए'मार्फत राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला. जो मुख्यमंत्र्यांनी स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे सुपूर्द केला. त्यामुळे धनंजय मुंडे आता मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाले आहेत.