

बीड जिल्ह्यातील मास्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांचा सहभाग असल्याचा आरोप होत असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली असून, या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावली नाही.