

Maharashtra Farmers
esakal
मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेल्या या वर्षाच्या सुधारित पंतप्रधान पीकविमा योजनेत यंदापासून ‘डिजिटल पीक सर्वेक्षण’ बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, विमा अर्ज भरतानाची नोंद आणि डिजिटल सर्वेक्षणातील पीक यांमध्ये तफावत आढळल्यास, डिजिटल सर्वेक्षणातील नोंदच अंतिम मानली जाईल.