Chatrapti Sambhaji Nagar: अखेर जिल्ह्यांचही झालं नामांतर! 'छत्रपती संभाजीनगर', 'धाराशीव'चं निघालं नोटीफिकेशन

यापूर्वी फक्त औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचं नामांतर झालं होतं, पण आता संपूर्ण जिल्ह्यांचं नामांतर झालं आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रमsakal media

मुंबई : केंद्र शासनाच्या मंजुरीनंतर औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचं नामांतर झालं होतं. पण यावरुन गोंधळ निर्माण झालो होता. शासानानं केवळ शहरांचंच नामांतर केलं जिल्ह्याचं नाही, असे आरोपही झाले. यानंतर आता या शहरांसह दोन्ही जिल्ह्यांचंही नामांतर अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव असं करण्यात आलं आहे. याचं गॅझेट नोटीफिकेशन शासनानं काढलं आहे. (districts have been renamed now Notification issued for Chhatrapati Sambhajinagar and Dharashiv)

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ कलम ४ पोट कलम (१) खंड सहानुसार आता औरंगाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नामकरण धाराशीव असं करण्यात आलं आहे.

हरकती नोंदवता येणार

दरम्यान, या गॅझेटमध्ये नोंद करण्यात आलेल्या बदलांवर जर नागरिकांना आक्षेप किंवा हरकती असतील तर त्यांना एक महिन्याच्या कालावधीत त्या नोंदवता येणार आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात या हरकतींवर सुनावणी करण्यात येईल. त्यामुळं हा आदेश २७ मार्च २०२३ पासून लागू होणार आहे.

नामांतराविरोधात हायकोर्टात याचिका

औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचं नामकरण धाराशिव करण्याला केंद्रानं मंजुरी दिली. पण या विरोधात मुंबई हायकोर्टात आव्हान याचिका दाखल झाली आहे. या जनहित याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टानं २४ मार्चपर्यंत या नामांतराबाबत उत्तर सादर करण्याचे आदेश केंद्राला दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com