Drought : राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र! दहा हजारांवर गावे, वाड्यांत दुर्भिक्ष; सरकारची डोळेझाक

राज्याला पाणीपुवरठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ २४ टक्के पाणीसाठा शिल्लक असून १० हजारांहून अधिक वाड्या, गावांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.
Water Shortage
Water Shortagesakal

मुंबई - राज्याला पाणीपुवरठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ २४ टक्के पाणीसाठा शिल्लक असून १० हजारांहून अधिक वाड्या, गावांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. नागरिकांसह पशुधन पाण्याअभावी संकटात आले असून, लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जीवनमरणाचा प्रश्‍न असलेल्या दुष्काळाकडे मात्र डोळेझाक करण्यात आली.

सध्या मॉन्सूनपूर्व पाऊस सुरू असला तरी हा पाऊस मुरवणीचा नसल्याने पाणीसाठ्यात फारसा फरक पडत नाही. शिवाय या पावसामुळे चाऱ्याचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटेल असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र वास्तवात तसा फारसा फरक पडेल असे शेतकऱ्यांना वाटत नाही. सध्या २९३४ गावे आणि ६५३९ वाड्यांवर ३६२२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जास्त असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

यात केवळ ९३ टँकर सरकारी तर ३५२९ खासगी टँकर्स आहेत. ज्या गावांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे तो केवळ पिण्यासाठी असून, जनावरांच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष आहे. परिणामी पशुधन संकटात आले आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक विभागात पाण्याचे संकट अधिक गंभीर होत असून पावसाकडे सर्वांचे डाळे लागले आहेत.

छत्रपती संभाजीनगर विभागात तब्बल १२३६ गावे, ४९८ वाड्या तर नाशिक विभागात ७४६ गावे आणि २५३६ वाड्या तहानल्या आहेत. येथे अनुक्रमे १८१२ आणि ८०३ टँकरद्वारे पाणीपुवरठा केला जात आहे. पुणे विभागातील ३७७५ वाड्या, ६२८ गावांना ७४८ टँकरद्वारे पाणीपुवरठा सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com