
मुंबई - Sushma Andhare : ठाणे जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी ठाकरे गटाच्या एका महिला कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने ठाणे पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. आदित्य ठाकरेंच्या टीकेला शिंदे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं.
एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेना मोठी करण्यामध्ये माझ्यासारख्या घरावर तुळशीपत्र ठेवलं. त्यामुळे सोन्याचा चमचा घेऊन आले आणि आयत्या पिठावर रोघोट्या ओढल्या, त्यांच्याविषयी मी काय बोलणार, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला. काल पण मी त्यांच्या फस्ट्रेशन पाहिलं. त्यांनी सर्व मर्यादा सोडल्या. सत्ता गेल्यावर काय परिस्थिती होती, हे पाहायला मिळाल्याचं ते म्हणाले.
मला ते गुंड मंत्री म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना फडतूस म्हणाले. त्यांच्या कार्यकाळात किती कांड झाले. दोन मंत्री जेलमध्ये गेले. गृहखात्याच्या आब्रुचे धिंडवले निघाले. नारायण राणेंना जेवनावरून उठवून जेलमध्ये टाकलं. कंगना रानौतच घर तोडलं. केतकी चितळेला जेलमध्ये टाकलं. त्यांनी किती गुंडागर्दी केली. हे विसरले का, असा सवाल शिंदे यांनी उद्धव यांना विचारला.
दरम्यान फडणवीसांना फडतूस म्हणाले, खर तर फडणवीस यांनी संयम बाळगला. ते 'उद्धट ठाकरे किंवा उध्वस्त ठाकरे' म्हणाले नाही. त्यांनी संयम बाळगला. ही संस्कृती आहे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. ते वैफल्यग्रस्त झाले असून हे जनता बघत आहेत, असंही शिंदे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.