
पुणे : ‘‘धर्म आणि निसर्गाचे रक्षण करणे सर्वांचे कर्तव्य आहे. कारण, नद्या आपल्या रक्तवाहिन्या आहेत. संत महात्म्यांनी नदीच्या काठीच आपले आयुष्य घालवले आहे. आज इंद्रायणी, चंद्रभागा, गोदावरी यांसह इतर तीर्थस्थळातून वाहणाऱ्या नद्यांची स्थिती बरी नाही. नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी लोक चळवळ व्हायला हवी. असे झाल्यास सर्व नद्या स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाहीत. देशातील आदर्श नद्या महाराष्ट्रात आहेत, असा लौकिक करण्यासाठी ही लोक चळवळ उभी करू’’, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीक्षेत्र देहू येथे आज केले.