
मुंबई - राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी दहा टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत पाच वर्षांत २६ टक्के वीजदर कमी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाचे आभार मानले आहेत.