सोलापूर : अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणे आणि आरोपींना शासन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे सरकारी वकिलांना वर्षापासून मानधनच मिळालेले नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोलापूर जिल्ह्यात 20 सरकारी वकिल असून त्यांचे एक वर्षापासून मानधन थकले आहे. दिवाळीपूर्वी मानधन मिळावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
ठळक बाबी...
गुन्हा घडल्यानंतर संशयित आरोपीचा त्यातील सहभाग आणि आरोपी निष्पन्न करुन त्याला कठोर शिक्षा करण्याच्या दृष्टीने जिल्हा सरकारी वकिल तथा अन्य सरकारी वकिल अथक परिश्रम घेतात. अन्याग्रस्तांच्या चेहऱ्यावर न्यायाच्या रुपाने हास्य फुलविण्यात सरकारी वकिलांचा मोठा वाटा राहिला आहे. रात्रंदिवस कायद्याचा अभ्यास करुन, संशयित आरोपीला शिक्षा व्हावी म्हणून कित्येक वर्षांपूर्वीचे दाखले ते गोळा करतात. एवढी मेहनत करुनही सरकारकडून सरकारी वकिलांना वर्षापासून मानधन देण्यात आलेले नाही. दरम्यान, दिवसातून दोन खटले चालविणे सरकारी वकिलांना आवश्यक आहे. त्यातून त्यांना अडीच हजार रुपयांचे मानधन मिळते. तर एका जामीन अर्जावरील सुनावणीनंतर त्यांना साडेसातशे रुपयांचे मानधन दिले जाते. त्यांना दरदिवशी तीन हजार रुपयांपर्यंत तर दरमहा कमाल 60 रुपयांपर्यंत मानधन दिले जाते. मिळणाऱ्या मानधनापेक्षा अधिक काम करुनही सरकारी वकिलांना वेळेत मानधन मिळत नसल्याचे दुर्दैवच आहे. दुसरीकडे संशयित आरोपीतर्फे काम करणाऱ्यांना सरकारी वकिलांपेक्षाही अधिक रक्कम मिळते. मात्र, सरकारची बाजू मांडणाऱ्यांना वर्ष- वर्ष मानधनच मिळत नाही, या तफावतीबद्दल आता नाराजीचा सूर निघू लागला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.