
मुंबई - एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलल्यानं पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. यावरून सरकारच्या भूमिकेवर टीका केली जात आहे. एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारशी चर्चा न करता परस्पर घेतला असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबतचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे. रद्द करण्यात आलेली परीक्षा पुन्हा घेण्याबाबत चर्चा सुरु असल्याचं म्हटलं
पुण्यात विद्यार्थी परीक्षा 14 तारखेलाच घ्या या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव सीताराम कुंटे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं जात आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनीही एमपीएससीची परीक्षा अवघ्या तीन दिवस आधी पुढे ढकलण्याचा निर्णय घेणं हे चीकीचं असल्याचं म्हटलं आहे.
एमपीएससीची परीक्षा 14 मार्चला होणार होती ती पुढे ढकलण्यात आल्याचं एमपीएससीने सांगितलं होतं. यानंतर लगेच विद्यार्थी आक्रमक झाले. एमपीएससीची परीक्षा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्याचे परीपत्रक काढले. आता पूर्व परीक्षा घेण्याबाबत सरकारी पातळीवर चर्चा सुरु असल्यांची माहिती समोर येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.