
अकोला : शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारण्याचा सरकारचा कधीही विचार नव्हता. त्यांना योग्य वेळी आणि योग्य प्रकारे कर्जमाफी दिली जाईल, असे स्पष्ट आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी आज अकोल्यात दिले. अकोला व वाशीम जिल्ह्यांच्या संयुक्त विकास आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार संजय खोडके, अमोल मिटकरी, किरण सरनाईक तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.