Mahatma Basavanna
sakal
- राज ब. जुबरे, संचालक, महाराष्ट्र बसव परिषद
महात्मा बसवण्णांनी सांगितलेल्या पाच नीतिमूल्यांना लिंगायत तत्वज्ञानात ‘पंचाचार’ असे म्हटले जाते. पंचाचारामध्ये लिंगाचार, सदाचार, शिवाचार, भृत्याचार आणि गणाचार हे पाच आचार येतात. पंचाचार म्हणजे, मनातील आंतरिक क्रिया शुद्ध करून, सुजाणपणे कर्मयोगाला प्रेरित करणे होय. लिंगाचाराने तन शुद्ध होते. सदाचाराने धन शुद्ध होते. शिवाचाराने मन शुद्ध होते. गणाचाराने क्रिया शुद्ध होते आणि भृत्याचाराने वाणी शुद्ध होते. हे पाच आचार म्हणजेच पाच नीतिमूल्ये होत. यांचा संक्षिप्त परिचय पाहू या.