नागपूर - ‘भाजपच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळात देशभर रस्त्यांचे जाळे विणले. उड्डाण पुलांची निर्मिती केली. मोदी सरकारच्या कार्यकाळात सर्वच क्षेत्रात देशाचा झपाट्याने विकास झाला आहे.
भविष्यात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याकडे जास्त लक्ष देण्याचे आपण ठरवले आहे. त्याकरिता मी अलीकडे शेतीमध्ये अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे,’ असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.