‘सर्वोच्च न्यायालयाने जो काही निर्णय दिला आहे, त्या निर्णयाच्या अनुषंगाने इतर धर्मीयांनी खोटे कागदपत्र देऊन अनुसूचित जातीचे (एससी) आरक्षण घेतले असेल, तर त्यांचे जातीचे प्रमाण रद्द करण्यात येईल..बळजबरीने, आमिष दाखवून किंवा फसवणूक करून कुणाचेही धर्मांतर करता येणार नाही, अशी तरतूद करण्यात येईल,’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना दिले..कोणी खोटे प्रमाणपत्र दाखवून सरकारी नोकरी करत असेल, कोणी खोटे कागदपत्रे दाखवून निवडणूक लढविली असेल तर त्यावरही कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी लक्षवेधी मांडली होती. या वेळी झालेल्या चर्चेत भाजपच्या आमदार चित्रा वाघ, आमदार प्रवीण दरेकर, उमा खापरे यांनी भाग घेतला..गोरखे म्हणाले की, राज्यात ‘क्रिप्टो-ख्रिश्चन’ लोकांकडून धर्मस्वातंत्र्याचा दुरूपयोग करून हिंदूंना खास करून अनुसूचित जाती/जमाती, भटक्या आणि विमुक्त जातीतील लोकांचे गुप्तपणे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्यात येत आहे.‘क्रिप्टो-ख्रिश्चन’ वापर करून महिलांची फसवणूक करून त्यांना जीव देण्यापर्यंतच्या घटना राज्यात घडत आहेत, असे वाघ म्हणाल्या. पंडित रमाबाई मिशन हा विषय वर्षभरापासून सभागृहात येत आहे. ज्या संस्था आहेत, त्या संस्थांच्या अंतर्गत मुलींना बळजबरीने ख्रिश्चन करणे, मारहाण करणे, त्यांना शौचालय धुवायला लावणे असे प्रकार होत असल्याकडे खापरे यांनी लक्ष वेधले..तक्रारी आल्यास संस्थांची चौकशीफडणवीस म्हणाले की, ‘आपल्या देशात स्वच्छेने कोणताही धर्म स्वीकारायला बंदी नाही; मात्र प्रलोभने दाखवून आणि बळजबरीनेने धर्मांतर मान्य नाही. धर्मांतराच्या घटना घडतात ही वस्तुस्थिती आहे. ज्या संस्थांच्या धर्मांतराच्या संदर्भात तक्रारी येत आहेत, त्या संस्थांची चौकशी करून निश्चित कारवाई केली जाईल.’.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.