चार वर्षांत परीक्षा नसल्यामुळे स्वयंघोषित सर्पमित्रांचा सुळसुळाट 

चार वर्षांत परीक्षा नसल्यामुळे स्वयंघोषित सर्पमित्रांचा सुळसुळाट 

मुंबई - मानवी वस्तीत आलेल्या सापांची सुटका करण्यासाठी वन विभागाकडून परीक्षा घेऊन सर्पमित्र निवडले जातात. परंतु, मागील चार वर्षांत अशी परीक्षा झालेली नाही. त्याचप्रमाणे 2015 मध्ये झालेल्या परीक्षेची पुढील प्रक्रियाही झालेली नाही. परिणामी, बोगस सर्पमित्रांचा सुळसुळाट झाला असून, त्यातूनच राजू सोळंकी या स्वयंघोषित सर्पमित्राचा शिवडी येथे नागाच्या दंशामुळे मृत्यू झाला, अशी चर्चा सुरू आहे. 

स्थानिक सर्पमित्रांसह जिल्हापातळीवर बैठक न घेणे, वन विभाग आणि प्राणिप्रेमी संघटनांमध्ये संवाद नसणे आदी उणिवा राजू सोळंकी प्रकरणानंतर पुन्हा समोर आल्या आहेत. ठाणे प्रादेशिक वन विभागाने ठाण्यातील कोपरी येथे 2015 मध्ये मुंबई विभागातील सर्पमित्रांसाठी घेतलेल्या परीक्षेला 50 जण उपस्थित होते. उत्तीर्ण झालेल्या व्यक्तींना "सर्पमित्र' असे ओळखपत्र दिले जाते. मात्र, ही परीक्षा दिलेल्या एकालाही असे ओळखपत्र मिळालेले नाही. साप आढळलेल्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होते. अशा वेळी ओळखपत्र असल्यास समस्या येत नाही, असे प्राणिप्रेमी संघटनांच्या सदस्यांनी सांगितले. 

प्राणिमित्र आणि वन विभाग यांच्यातील संवाद वाढावा, यासाठी ठाणे प्रादेशिक वन विभागातील तत्कालीन मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी बैठका घेतल्या होत्या. सर्पमित्रांनी साप पकडल्यानंतर तातडीने वन विभागाला कळविणे, जिल्हानिहाय बैठक घेऊन समस्या जाणून घेणे आदी बाबींचे नियोजन झाले होते. त्यावर अद्याप अपेक्षित कार्यवाही झालेली नाही, अशी तक्रार प्राणिप्रेमी करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com