सरकारच्या हुकुमशाहीला गांधीजींच्या अहिंसेने उत्तर देऊ : शरद पवार

Untitled-2.jpg
Untitled-2.jpg

मुंबई : ''मोदी सरकार हे सध्या हुकुमशाही नीती वापरत आहे. जेएनयूमध्ये जे काही झाले ते योग्य नव्हते, त्यामुळे संपुर्ण देशात सरकारला विरोध होत आहे. सरकारच्या हुकुमशाहीला गांधीजींच्या अहिंसा तत्वाने उत्तर द्यायला हवे.'' असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महात्मा गांधी शांती यात्रेला हिरवा कंदील दाखवताना व्यक्त केले.

आज केंद्रीय माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी महात्मा गांधी शांती यात्रेचे आज गेट वे ऑफ इंडिया येथून आयोजन केले होते. ही यात्रा ३१ जानेवारीला दिल्लीतील राजघाटावर पोचणार आहे. या गांधी शांती यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी हिरवा कंदील दाखवला. 

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) याविरोधात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली गेट वे ऑफ इंडिया येथून ‘गांधी शांती यात्रे’ला गुरुवारी सकाळी सुरुवात झाली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, आशिष देशमुख, मंत्री नवाब मलिक आदी नेते उपस्थित होते. गेट वे ऑफ इंडिया येथून सुरु झालेल्या या यात्रेचा शेवट दिल्लीतील महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ राजघाट येथे होणार आहे.

CAA आणि NRC बाबत देशातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कागदपत्र नसतील तर लोकांना भीती आहे की, सरकारकडून त्यांना सरकारने निर्माण केलेल्या कॅंम्पमध्ये रहावे लागेल अशी परिस्थिती सरकारने निर्माण केली आहे.

पवार म्हणाले, ''देशात आज जी स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे देशातील जनता सरकारवर नाराज आहे. त्यांना रस्ता दाखवणे गरजेचे आहे. त्यासाठी महात्मा गांधींचा सत्याग्रहाचा मार्गच योग्य आहे, ही जबाबदारी यशवंत सिन्हा यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. या नव्या कायद्यामुळे देशाच्या ऐकतेवर घाला घालण्यात आला आहे. समजातील गरीब वर्ग, अल्पसंख्यांक सांगू शकत नाहीत की ते कुठून आले आहेत, त्यामुळे त्यांची अडचण झाली आहे. समाजात जागृती करण्यासाठी एकता निर्णाण करणे गरजेचे आहे. नवी पिढी रस्त्यावर शांततेने येऊ पाहत आहे, मात्र त्यांना येऊ दिले जात नाही. जेएनयूत जे काही झालं त्याचा परिणाम आपण ठिकठिकाणी पाहत आहोत. त्यामुळेच यामध्ये जर बदल घडवून आणायचा असेल तर आपल्याला महात्मा गांधींचा मार्ग अवलंबने गरजेचे आहे.” 

यशवंत सिन्हा म्हणाले, “मोदी सरकारने आणलेला हा कायदा देशाचे विभाजन करणारा आहे. मात्र, आम्ही पुन्हा देशाचे विभाजन होऊ देणार नाही. आम्ही गांधींची पुन्हा हत्या होऊ देणार नाही. यापूर्वी आम्ही एक होतो आणि यापुढेही एक राहू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.”

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “ऐंशीव्या वर्षी यशवंत सिन्हा यांनी काढलेल्या या यात्रेचं कौतुक केलं पाहिजे. ही लढाई मोठी आहे पण सरकार सहजासहजी ऐकेलं असं मला वाटतं नाही. सरकारने ६ महिन्यांपूर्वीच डिटेन्शन कँप बांधले आहेत. हे एक प्रकारचं युद्धच असून ते शांततेनं लढावं लागेल. हा राजकीय लढा असल्याने तो राजकीय प्लॅटफॉर्मवरच लढला पाहिजे. आपण संविधानासाठी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या अजेंड्यासाठी लढत असल्याचे ते यावेळी म्हणाले.”

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com