- उदित नारायण, ज्येष्ठ गायकशास्त्रीय संगीत, गझल, रोमँटिक गाणी असो वा ‘दम मारो दम’सारखी पाश्चात्य धाटणीची गाणी पाहिलीतर आशा भोसले यांच्या आवाजातील अष्टपैलू बाजू थक्क करणारी होती. त्या संगीतातील सरस्वती होत्या..आशाताई या खऱ्या अर्थाने भारतीय संगीतसृष्टीचा अढळ आधारस्तंभ होत्या. त्यांचा दैवी आवाज रेडिओवर ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो. त्यांच्या गाण्यांच्या ओढीने आम्ही अनेक तास रेडिओसमोर बसून राहायचो. त्या महान गायिकेला प्रत्यक्ष भेटण्याचे आणि त्यांच्यासोबत काम करण्याचे सौभाग्य मला लाभेल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. केवळ देवाची कृपा आणि चाहत्यांच्या प्रेमामुळे हे सुवर्णक्षण अनुभवता आले..‘लगान’ चित्रपटातील ‘राधा कैसे ना जले..’, ‘दिल तो पागल है’मधील ‘दिल तो पागल है’ व ‘ले गयी, ले गयी’ आणि अजय देवगणच्या ‘प्यार तो होना ही था’मधील ‘अजनबी मुझको इतना बता’ यांसारखी अनेक अजरामर गाणी मला त्यांच्यासोबत गाता आली, हे मी माझे परमभाग्य समजतो. त्यांनी आम्हा सर्व गायकांना भारतीय सिनेमा, संगीत आणि आपल्या समृद्ध संस्कृतीचा खरा इतिहास प्रत्यक्ष जगून दाखवला..आशाताईंचे व्यक्तिमत्त्व अत्यंत हसतमुख आणि ऊर्जेने भरलेले होते. त्यांना संगीताची प्रचंड ओढ होती. खाण्या-पिण्याची त्यांना खूप आवड... कपड्यांची हौस भारी आणि विशेषतः रेकॉर्डिंगच्या वेळी त्या ज्या साड्या परिधान करायच्या, त्यांची नजाकत खरोखरच पाहण्याजोगी असायची. संगीताच्या बाबतीत तर त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही, इतक्या त्या श्रेष्ठ होत्या.माझी आणि त्यांची पहिली भेट १९८० साली पंचम दा (आर. डी. बर्मन) यांच्यामुळे झाली. ‘गेहरा जखम’ या चित्रपटासाठी मी, महंमद रफी आणि आशाताई एका गाण्यासाठी एकत्र आलो होतो. ‘चाल मे माल लेके आया’ हे ते गाणे होते. त्यावेळी मी काहीसा बावरलेलो होतो. परंतु त्यांनी मला धीर दिला..त्यानंतर आम्ही अनेक दशके एकत्र काम केले. पण त्यांच्याबद्दलचा आदर कधीही कमी झाला नाही. माझ्या संघर्षाच्या दिवसांतील एक आठवण आजही माझ्या डोळ्यासमोर ताजी आहे. मी एकदा होळीच्या दिवशी त्यांच्या पेडर रोडवरील घरी गेलो होतो. त्यावेळी त्या स्वतः रंगाने माखलेल्या होत्या. तरीही त्यांनी मला मायेने टिळा लावला आणि आशीर्वाद दिला. तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी शिदोरी आहे..त्यानंतर १९९७ मध्ये माझ्या वाढदिवसाला मी त्यांना निमंत्रण दिले होते. त्या अत्यंत व्यग्र होत्या. त्या येतील असे मला वाटले नव्हते. मात्र, त्यांनी वेळात वेळ काढून हजेरी लावली. त्या दिवशी त्यांनी तब्बल दोन तास माझ्याशी गप्पा मारल्या. ‘तुझा आवाज खूप ओरिजिनल आहे, तू स्वभावाने साधा आहेस, तुला अजून खूप मोठी मजल मारायची आहे,’ असे सांगत त्यांनी दिलेला पाठिंबा व प्रोत्साहन माझ्यासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा होता. त्या साक्षात सरस्वतीचा अवतार होत्या..शास्त्रीय संगीत, गझल, रोमँटिक गाणी असो वा ‘दम मारो दम’सारखी पाश्चात्य धाटणीची गाणी पाहिली, तर त्यांच्या आवाजातील अष्टपैलू बाजू थक्क करणारी होती. ‘इन आँखों की मस्ती के’ या गाण्यामधील जी नजाकत त्यांनी जपली, ती फक्त त्याच करू शकतात. वयाच्या या टप्प्यावरही त्या उत्साहाने कॉन्सर्ट आणि स्टेज शो करत होत्या. त्यांची ऊर्जा व उत्साह आम्हा सर्वांना खरंच प्रेरणादायी होती.त्यांना महाराष्ट्र सरकारतर्फे ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन गौरवण्यात आले, तेव्हा आमची शेवटची भेट झाली होती. त्यांच्या आशीर्वादानेच मी इथपर्यंत पोहोचलो आहे. देवाने त्यांना ज्या दिव्य कार्यासाठी पृथ्वीवर पाठवले होते, ते त्यांनी शंभर टक्के पूर्ण केले आहे. त्यांच्या जिद्दीतून, ध्यासातून आणि मेहनतीतून आजची आणि येणारी प्रत्येक पिढी सदैव प्रेरणा घेत राहील..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.