आनंदाची बातमी; उजनीमध्ये सहा दिवसात वाढले दोन टीएमसी पाणी 

आनंदाची बातमी; उजनीमध्ये सहा दिवसात वाढले दोन टीएमसी पाणी 

सोलापूर ः पावसाळ्याच्या हंगामामध्ये सोलापूरसह पुणे, नगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा या उजनी धरणाकडे लागलेल्या असतात. कधी एकदा धरण शंभर टक्के भरते याकडे सगळ्यांच्या नजरा असतात. नुकतेच मृग नक्षत्र संपले आहे. या नक्षत्रामध्ये यंदा चांगला पाऊस झाला आहे. त्या पावसामुळे मागील सहा दिवसात उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये जवळपास दोन टीएमसीने वाढ झाली आहे. ही बातमी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची आहे. 

उजनी धरणाला जिल्ह्याची वरदायिनी असे म्हटले जाते. या धरणावर जिल्ह्यातील जवळपास सव्वा दोन लाख हेक्‍टरवरील उसक्षेत्र अवलंबून आहे. या धरणाच्या जोडीला नीरेचे पाणीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीला येत असल्यामुळे जिल्ह्याचे नंदनवन झाले आहे. मात्र, याला काही तालुके अपवाद आहेत. या तालुक्‍याला उजनी व निरेचे पाणी देण्यात अद्यापही राज्यकर्त्यांना यश आले नाही. मात्र, ज्या-ज्या भागामध्ये उजनीचे पाणी फिरले आहेत. त्या भागातील उसाचे क्षेत्र जोमाने वाढले आहे. ऊस वाढल्याने त्याठिकाणच्या शेतकऱ्यांमध्ये सुबत्ता आली आहे. आर्थिक सुबत्ता आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

यंदाच्या उन्हाळी हंगामात धरणातून शेतीसाठी पाणी सोडले होते. त्यामुळे धरणाची पाणीपातळी वजा 25 टक्‍यांच्या पुढे गेली होती. त्यातच पावसाळा सुरु झाल्याने मृग नक्षत्रात धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाला आहे. त्या पावसाचे पाणी धरणात आल्याने धरणाच्या पाणीपातळीत जवळपास दोन टीएमसी इतकी वाढ झाली आहे. त्याचबरोबर धरणाच्या पाणीपातळीत मागील सहा दिवसात तब्बल चार टक्‍यांनी वाढ झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com