मुंबई - ‘राज्य सरकारने विमा हप्त्यापोटी एक हजार कोटींची रक्कम दिली नसल्याने, शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळालेली नाही. परिणामी २०२३ - २४ मधील खरीप व रब्बी हंगामातील विमा भरपाईपासून शेतकरी वंचित राहिल्याची कबुली कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानपरिषदेत दिली.