मुंबई - ‘राज्यात मुसळधार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, संकटातील शेतकऱ्याला मदतीची गरज आहे. दुसरीकडे राज्याचे मंत्रिमंडळ, मात्र केंद्रीय अमित शहा यांची खुशामत करण्यात मग्न आहे..पंचनाम्याचे सरकारी सोपस्कर बाजूला ठेवून सरकारने नुकसानग्रस्तांना एकरी २० हजार रुपये मदत तातडीने द्यावी,’ अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.गांधी भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान सपकाळ म्हणाले, की बळीराजा संकटात आल्यास त्याला तातडीने मदत करण्याचे काम काँग्रेसचे सरकार असताना अनेकदा करण्यात आले. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मोठे संकट आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे..अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मोफत बियाणे व खते द्यावीत. दुसरीकडे महाराष्ट्रावर ओढवलेल्या या संकटावर अमित शहा एक शब्दही बोलले नाहीत..ठाकरेंची भांडी फोडणार : नारायण राणेमहापालिकेत २६ वर्षे सत्ता असताना मुंबईतील पाण्याचा निचरा होण्यासाठी काय केले, असा सवाल करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भ्रष्टाचाराची भाषा करू नये. मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी तुमची सगळी भांडी फोडणार आहे, असा इशारा खासदार नारायण राणे यांनी दिला..ते म्हणाले, की मुंबईत पाण्याचा निचरा होत नाही म्हणून अनेक उपाययोजना सुरु आहेत. २६ वर्षे तुमची सत्ता असताना का उपाययोजना केल्या नाहीत? २००५ मध्येही मुंबईत ९४४ मिलिमीटर पाऊस पडला होता. यापेक्षाही भयंकर परिस्थिती होती..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.