राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानामुळे सध्या राज्यात मोठा गदारोळ माजला आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी याविषयीचा संताप व्यक्त केला आहे. हा महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान असल्याची भावना राज्याच्या राजकारणातून व्यक्त होत आहे. याबद्दल आता राज ठाकरेंनीही संताप व्यक्त केला आहे.
राज ठाकरेंनी ट्वीट करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दलचा राग व्यक्त केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये राज ठाकरे म्हणतात, आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहित नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे. म्हणून आपल्याविरुद्ध बोलायला लोक कचरतात. परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना दुखावल्या जातात.
राज ठाकरे पुढे म्हणतात की, महाराष्ट्रात मराठी माणसानं इथलं मन आणि जमीन मशागत करुन ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक इथं व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय, हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.