
राज्यातील १५ जिल्ह्यातील २३८ ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले असून आज निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये शिंदे गट आणि भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असून ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं चित्र पहायला मिळालं आहे.
(Gram Panchayat Election 2022)
शिवसेनेतील फूट आणि राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच निवडणुका पार पडल्या असून त्यातही शिंदे गट आणि भाजपने बाजी मारल्याचं पहायला मिळालं आहे. शिंदे गटाने ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त जागा जिंकल्याने जनतेचा शिंदे गटाला कौल असल्याचं चित्र पहायला मिळालं आहे.
या निवडणुकात मुख्यत्वे करून शिंदे गट आणि ठाकरे गटात चुरस पहायला मिळाली असून शिंदे गटाकडे ३७ तर ठाकरे गटाकडे २८ ग्रामपंचायतीचा ताबा मिळाला आहे. त्यामुळे या निवडणुकांत शिंदे गट आणि भाजपाने मुसंडी मारली आहे. औरंगाबादच्या वडगाव कोल्हाटी या मोठ्या ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने विजय मिळवल्यावर जोरदार जल्लोष करण्यात आला आहे.
राज्यातील २३८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा भाजपने जिंकल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानी आहे. भाजप, राष्ट्रवादीनंतर शिंदे गटाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. दरम्यान निवडणुकांचा पूर्ण निकाल हाती येणं बाकी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.