आरोग्य भरतीचा घोळ सरता सरेना! टोपे साहेब उत्तर द्या! विद्यार्थ्यांचा ट्विटरवर संताप

आरोग्य भरतीचा घोळ सरता सरेना! टोपे साहेब उत्तर द्या! विद्यार्थ्यांचा ट्विटरवर संताप

पुणे : मागील महिन्यात आयोजित आरोग्यसेवेतील पदभरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर गोंधळ पाहायला मिळाला. उमेदवारांना चुकीचे प्रवेशपत्र किंवा प्रवेशपत्र न मिळणे आदी तक्रारी आल्या होत्या. प्रत्यक्ष लेखी परीक्षा घेण्यासाठी आवश्यक केंद्रांची कमतरता, उत्तरप्रदेशपासून चीनच्या वूहाण प्रांतातील पिनकोड प्रवेशपत्रावर देण्यात आला होता. राज्यातील आठ लाख ६० हजार उमेदवारांच्या भवितव्य निश्चित करणारी ही लेखी परीक्षा प्रचंड अनागोंदीमुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना स्वतः माध्यमांपुढे येत पुढे ढकलावी लागली होती. त्यांनी त्यावेळी सारवासारव केली खरी; मात्र अजूनही हा प्रश्न सुटल्याचं दिसून येत नाहीये. याबाबत आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. परीक्षा केंद्रांवर मोबाईल जामर नाहीयेत तसेच एकाच बेंचवर दोन विद्यार्थी कसे बसू शकतात? असा सवाल देखील विद्यार्थी करत आहे. इतकंच नव्हे तर एकाच दिवशी दोन शहरांतील दोन केंद्रांवर पेपर असणारे हॉल तिकीट देखील विद्यार्थ्यांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी ट्विटरवर आपला संताप व्यक्त करत आहेत.

आरोग्य भरतीचा घोळ सरता सरेना! टोपे साहेब उत्तर द्या! विद्यार्थ्यांचा ट्विटरवर संताप
'मनसेला सोबत घेतल्यास नुकसान; भाजप, आरपीआय युतीला 100 जागा मिळणार'

आधी दिले ओळखपत्र नंतर पैसे न भरल्याचा कांगावा

आरोग्य विभागाद्वारे विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी उमेदवारांच्या परीक्षा केंद्रांमध्ये अद्यापही बदल झालेला नाही. आता उमेदवारांना पैसेच भरले नसल्याचे कारण सांगून ओळखपत्र दिले नसल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात आरोग्य विभागामार्फत विविध पदांसाठी परीक्षा सप्टेंबर मध्ये घेण्याचे ठरले. यामध्ये १० वी आणि १२ वी अर्हता असलेला आणि पदवीधर अर्हता असलेला पदासाठी गट ‘क’, गट ‘ड’ अशा दोन गटातून परीक्षा घेण्यात येणार आहेत. यापैकी गट क परीक्षा २४ तर गट ड ची ३१ तारखेला होणार आहे. काही विद्यार्थ्यांना उत्तरप्रदेश आणि इतर राज्यातील केंद्र मिळाल्याने परीक्षा रद्द करण्याची नामुष्की विभागावर ओढविली. त्यानंतर आता २५ आणि ३१ ऑक्टोबरला नव्याने परीक्षा घेण्याची घोषणा करण्यात आली. परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ओळखपत्रात घोळ झाल्याचे दिसून आले. एकाच विद्यार्थ्याला दोन परीक्षांसाठी वेगवेगळे केंद्र आणि तेही विविध जिल्ह्यात देण्यात आल्याची बाब उघडकीस आली. काही उमेदवारांना परीक्षा रद्द करण्यापूर्वी ओळखपत्र पाठविल्यानंतरही नव्याने तारखा जाहीर केल्यावर पैसेच भरले नसल्याचे सांगून ओळखपत्र देण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांकडे पैसे भरल्याची पावती आहे.

आरोग्य विभागातील परीक्षेचा गोंधळ सुरूच

आरोग्य विभागाच्या परीक्षेत प्रचंड घोळ सुरू आहे. अद्याप अनेक उमेदवारांना ओळखपत्र मिळालेले नाही. काही उमेदवारांनी पैसेच भरले नसल्याचे सांगण्यात येत आहे. खासगी कंपनीच्या माध्यमातून घेण्यात येत असलेली परीक्षा संपूर्णपणे उमेदवारांच्या आयुष्याशी खेळत असून बरेच उमेदवार कुठल्या तरी एका परीक्षेला मुकणार आहेत, अशी मत एमपीएससी समन्वय समितीचे सचिव नीलेश गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com