मुंबईसह लगतच्या जिल्ह्यांत येणार उष्णतेची लाट; हवामान खात्याचा इशारा

नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे.
उष्णतेची लाट
उष्णतेची लाटesakal

नवी दिल्ली : मुंबईसह लगतच्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. येत्या १६ मार्चपर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. त्यामुळं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे. (Heat wave in Mumbai and adjoining districts warning by IMD)

हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या १६ मार्चपर्यंत उष्णतेची लाट असणार आहे. त्यामुळं नागरिकांनी बचावात्मक उपाययोजना करुन काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.

उष्णतेची लाट
"अजितदादांना मानलंच पाहिजे, राष्ट्रवादीच्या खात्यांना सर्वाधिक निधी"

उत्तर-पश्चिम भारताकडून कोरडी आणि गरम हवा वाहत असल्यानं समुद्रावरुन वाहणारे वारे वाहण्यास उशीर होत आहे. त्याचबरोबर सध्या आकाश निरभ्र आहे. हवामानाची ही परिस्थिती लक्षात घेऊन कोकणातील किनारी जिल्ह्यांना जसे रायगड, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला तीन दिवसांसाठी १४, १५ आणि १६ मार्च रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी काळजी घ्यावी, उन्हात जाणं टाळावं, सैल आणि सुती कपडे वापरावेत आणि भरपूर पाणी प्यावं असं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com