मुंबई: शाळा कधी सुरु होणार? याविषयी अजून संभ्रमावस्था कायम आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (varsha gaikwad) यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. शाळा सुरू (School opening) करण्याचा निर्णय हा स्थानिक प्रशासनाचा आहे. कुठलीही जबरदस्ती करत शाळा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
"शिक्षण सचिवांनी आमचा सूचना अहवाल टास्क फोर्सकडे पाठवला आहे. याबाबत दोन दिवसांत बैठक घेत शाळा सुरू करण्याचा निर्णय होईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षेला आम्ही प्राधान्य दिले आहे" असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
शाळा सुरू करण्याबाबत सरकार मध्ये कुठलाही मतभेद नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले. "काल आमची टास्क फोर्स बरोबर बैठक झाली. आमचा आणि टास्क फोर्सचा अजेंडा सारखाच आहे. मुलांच्या सुरक्षिततेला आमचं पहिलं प्राधान्य आहे. मागच्यावर्षभरात आम्ही मुलांच्या सुरक्षिततेला पहिलं प्राधान्य दिलं आहे" असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
"मागच्या वर्षभरात मुंबई, पालघर आणि पुणे येथे शाळा सुरु झाल्या नाहीत. आम्ही निर्णयाचे विकेंद्रीकरण केलय. ग्रामीण भागात जिल्हाधिकारी आणि शहरी भागात आयुक्तांना निर्णय स्वातंत्र्य दिलं आहे" असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.