Jan Suraksha Bill : ‘जनसुरक्षे’मुळे विकासमार्ग खुला; प्रकल्पांना विरोध डाव्यांकडून : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

Ravindra Chavan : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जनसुरक्षा विधेयकामुळे गडचिरोली, चंद्रपूरसह राज्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
Jan Suraksha Bill
Jan Suraksha Bill Sakal
Updated on

मुंबई : राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजूर केलेल्या जनसुरक्षा विधेयकामुळे राज्यातील विकासाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे मत भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज व्यक्त केले. विशेष म्हणजे राज्यातील आदिवासीबहुल पण मागास असलेल्या नक्षलग्रस्त गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांचा विकास होऊ शकणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com