

‘‘चारचाकी वाहनातून फिरणाऱ्यांसाठी पूल, बोगद्यांच्या अनेक घोषणा या अर्थसंकल्पात केल्या आहेत. मात्र दुसरीकडे एसटी बस, रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सर्वसामान्य लोकांची थट्टा करणारा अन फक्त आश्वासनांचा हा अर्थसंकल्प आहे,’’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.