'...तर भाजपला मुंबईत फिरणे अशक्‍य'

'...तर भाजपला मुंबईत फिरणे अशक्‍य'
Updated on

मुंबई - शिवसेनेने ठरवले तर भाजप नेत्यांना मुंबईत फिरणेही अशक्‍य होईल, असा इशारा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी काल दिला. 

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यानंतर महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून भाजपला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. 

राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, भाजप ज्यांचा बाप काढत आहे, त्यांनी मनात आणले तर मुंबईत फिरणे अशक्‍य होईल. शेलार यांनी "सुधारित नागरिकत्व कायदा लागू न करायला हे बापाचे राज्य आहे का' असे विधान केले होते. या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. 

पाटील म्हणाले, ""भाजपने इतके घसरण्याची गरज नाही. मला वाटते त्यांना आशा होती, ती पूर्ण झाली नाही. म्हणूनच भाजप चिडला आहे आणि बाप काढण्याच्या पातळीवर गेला आहे. आपण कुणाचा बाप काढतो आहोत याचेही यांना भान राहिलेले नाही. ते ज्यांचा बाप काढतात त्यांनी जर मनात आणले तर यांना मुंबईत फिरणे देखील अशक्‍य होईल.'' 

इतकी पातळी घसरण्याची भाजपवर का वेळ आली यावर भाजपने आत्मचिंतन करावे, असा चिमटाही जयंत पाटील यांनी काढला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com