- पांडुरंग म्हस्के
मुंबई - गेले किमान तीन आणि कमाल पाच वर्षे लोकप्रतिनिधींच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०१७ च्या प्रभाग रचनेनुसार करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. मात्र या निवडणुकांसाठी तब्बल एक लाख ‘ईव्हीएम’ यंत्रांची आवश्यकता असल्याने या निवडणुका दोन टप्प्यांत होण्याची शक्यता आहे.