sansad bhavan
sansad bhavansakal

मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीची मतदार यादी २२ जानेवारीला होणार अंतिम; ‘या’ विभागातील कर्मचाऱ्यांना असणार इलेक्शन ड्यूटी

राज्य व केंद्र सरकारचे सर्व कर्मचारी (जिल्हा परिषद महसूलसह सर्वच विभाग), अनुदानित संस्था, अंगणवाडी सेविका, एलआयसीचे कर्मचारी, बॅंका अशा कर्मचाऱ्यांना मतदान ड्यूटी असते. त्याची विभागनिहाय माहिती निवडणूक कार्यालयाने संकलित केली आहे.

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला असून मार्चमध्येच आचारसंहिता जाहीर होईल, अशी सद्य:स्थिती आहे. गतवर्षी १० मार्च रोजी आचारसंहिता लागू झाली होती. यंदा सोलापूर जिल्ह्यात लोकसभेसाठी तीन हजार ५९९ मतदान केंद्रे असतील. त्यात संवेदनशील मतदान केंद्रे कोणती असतील, याची कार्यवाही महसूल व पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे.

सोलापूर जिल्ह्यात माढा व सोलापूर असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. सोलापूर जिल्ह्यात एकूण ३६ लाख ३३ हजार ७२ मतदार असून त्यात १८ ते २९ वयोगटातील ११ लाख ४९ हजार ४२४ तर ७० वर्षांहून अधिक वय असलेल्या मतदारांची संख्या अडीच लाखांहून अधिक आहे. सध्या मयत, दुबार मतदारांची नावे कमी करणे, नावात दुरुस्ती अशी कार्यवाही सुरू आहे. १२ जानेवारीपर्यंत ही कार्यवाही पूर्ण करून अंतिम मतदार यादी २२ जानेवारीला प्रसिद्ध केली जाणार आहे.

तत्पूर्वी, जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन वाहनांद्वारे ‘ईव्हीएम’संदर्भात जनजागृती केली जात आहे. प्रत्येक प्रांताधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयातही एक मशिन ठेवण्यात आले आहे. ज्या मतदारांना ‘ईव्हीएम’ची माहिती नाही किंवा पहिल्यांदाच मतदान करीत आहेत, त्यांना त्या मशिनवर मतदान करून आपण केलेले मतदान त्याच पक्षाला किंवा उमेदवाराला जाते का, याची खात्री करता येणार आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत ही जनजागृती सुरू राहील.

शिक्षकांसह २४ हजार कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्यूटी

राज्य व केंद्र सरकारचे सर्व कर्मचारी (जिल्हा परिषद महसूलसह सर्वच विभाग), अनुदानित संस्था, अंगणवाडी सेविका, एलआयसीचे कर्मचारी, बॅंका अशा कर्मचाऱ्यांना मतदान ड्यूटी असते. यंदा सोलापूर व माढा या दोन लोकसभा मतदारसंघासाठी सोलापूर जिल्ह्यातील अंदाजे २४ हजार कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्यूटी असणार आहे. त्याची विभागनिहाय माहिती निवडणूक कार्यालयाने संकलित केली आहे.

संवेदनशील मतदान केंद्रे कोणती?

एका मतदान केंद्रांवर एकाच उमेदवाराला ९० टक्क्यांपेक्षा अधिक मते पडली असल्यास आणि एका मतदान केंद्रावरील एका बुथवर एकाच उमेदवाराला ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले असल्यास व ज्या मतदान केंद्रावर काही गोंधळामुळे फेरमतदान घेण्याची वेळ आलेली असल्यास अशी मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित होतात. तत्पूर्वी, पोलिसांकडून त्या केंद्रावरील गुन्ह्यांची देखील माहिती घेतली जाते. त्यानंतर संवेदनशील मतदान केंद्रांची यादी जाहीर केली जाते. मागील लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील ८३ केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित झालेली होती. त्याठिकाणी विशेष पोलिस बंदोबस्त व अगाऊ कर्मचारी नेमले जातात.

मतदानावेळी आवश्यक कर्मचाऱ्यांची माहिती संकलित

लोकसभा निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात असून २२ जानेवारीला मतदार यादी अंतिम होईल. मतदानावेळी किती कर्मचारी लागतील, संवेदनशील मतदान केंद्रे किती व कोणती याचीही कार्यवाही लवकरच पूर्ण होणार आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठीही विशेष प्रयत्न सुरू आहेत.

- गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com